23.9 C
Madhya Pradesh
July 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20210730 WA00033
महाराष्ट्र

कोळी समाजाच्या दोन युवकांचा व्यापारी संघटनेकडून जाहीर सत्कार.

Bundelikhabar


मुम्बई / जगताप सुनील
आंबिवली : अटाळी परिसरातील दोन कोळी समाजाचे शूरवीर विवेक कोनकर व शैलेश पाटील या अतिगरीब कुटुंबातील धाडसी वीरांनी नुकत्याच आलेलेल्या महापुरात वासुंद्री पुलापासून काळू नदीत अटाळीपर्यंत वाहत आलेल्या पाण्यातून वाघमारे या युवकाला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या नदीत उड्या मारून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. अशा या देवदूतासारखी कामगिरी करणार्‍या या शूरवीरांचे कै. गजानन हिरू पाटील विद्यालयात प्रमुख पाहुणे कडोंमपा राजेश सावंत अ प्रभाग श्रेत्र आयुक्त, खडकपाडा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोकजी पवार साहेब यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला।

यह भी पढ़ें-राष्ट्रीय मानव अधिकार अपराध एवम् भ्रष्टाचार विरोधी ब्यूरो” की मनाई गई तीसरी वर्षगाँठ

यावेळी नारायण शेठ अध्यक्ष, अटाळी-आंबेवली व्यापारी मित्र मंडळ, भाऊसाहेब शिंदे उपाध्यक्ष, विलासराव रंधवे कार्याध्यक्ष, भगवान वाघ सेक्रेटरी, दिनेश पटेल खजिनदार, राजू जडेजा उपखजिनदार, संजय इंदुलकर, विठ्ठल वाघ, चौधरी मेडिकल, जनार्दन पाटील सल्लागार,  गजानन पाटील सल्लागार, दुर्योधन पाटील, नवनाथ पाटील, मारुती पाटील, मुकेश पाटील, दशरथ तरे, रमेश पाटील, दशरथ  पाटील, इंटक पाटील, गणेश पाटील सर, आवारी सर, के. पी. आहेर, नरेश पाटील व सर्व व्यापारी मित्र मंडळाचे सदस्य व परिसरातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते।

IMG 20210730 WA00032

Bundelikhabar

Related posts

आपले मानवाधिकार फाउंडेशन ने सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आणखी सक्रिय व्हावे: समाजसेवक अण्णा हजारे

Bundeli Khabar

राज्यमंत्री विवेक पंडित यांचा कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात पाहणी दौरा

Bundeli Khabar

शिवसेनचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुंबई नाशिक महामार्ग अडविला

Bundeli Khabar
error: Content is protected !!