Bundeli Khabar
Home » कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंदला
महाराष्ट्र

कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंदला

Bundelikhabar

कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंदला
ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष
दयानंद चोरघे यांचा जाहीर पाठिंबा

किशोर पाटील/महाराष्ट्र
शाहपुर : सोमवार दि‌नांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंद ला पाठिंबा देत ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हाभर आंदोलन केले.हे कायदे शेतकरी हिताचे नसून मूठभर धन दांडगे,उद्योगपती यांच्या फायद्याचे असुन यातून शेतकरी व ग्राहक दोघांचेही नुकसानच होणार आहे.त्यामुळे या कायद्या विरोधात शेतक-यांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाले आहेत.शेतक-यांनी उभारलेल्या या आंदोलनाला काँग्रेसने जाहीर पाठिंबा देत ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे शहापुर येथे आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी आमदार दौलत दरोडा,शहापुर काँग्रेस तालुका अध्यक्ष महेश धानके,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे, बहुजन विकास आघाडी योगेश हजारे तसेच प्रहार संघटना व सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

तरुण युवकांनी रात्रीच्या वेळी आपल्या गावचे संरक्षण करण्यासाठी पोलिस यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे – मिथुन घुगे

Bundeli Khabar

मिकी सिंह का नया गाना ‘सॉरी’ हुआ रिलीज़

Bundeli Khabar

वीजबिल वसुलीला गती द्या; प्रभारी सहव्यावस्थापकीय संचालक रेशमे यांचे निर्देश

Bundeli Khabar
error: Content is protected !!