सुनील जगताप/महाराष्ट्र
आंबिवली : भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अटाळी, आंबविली येथील समाजसेवक तसेच भाजपा उपाध्यक्ष टिटवाळा-मोहने मंडळ विलासमामा रंदवे यांच्या प्रयत्नातून परिसरातील गोरगरिबांना मोफत धान्याचे किट वाटप करण्यात आले. यापूर्वीही त्यांंनी अनेक कठीण प्रसंगात परिसरात गरीब कुटुंबांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलेले आहे।
यावेळी विलासमामा रंदवे, नवनाथ पाटील (वडवली गावप्रमुख), शशिकांत पाटील (उपाध्यक्ष टिटवाळा-मोहने मंडळ), कैलास पाटील (भाजपा प्रवक्ते), संदेश पाटील, सचिन पाटील, भूषण पाटील, भालचंद्र पाटील, राहुल पाटील, भावेश पाटील, अक्षय पाटील, सुमित पाटील, सदा घोडके, बबलू सुर्यवंशी, रुपेश रंदवे, कृष्णा रंदवे, दिनेश कागे तसेच महिला आघाडी सौ. कविता रंदवे (एसईओ), सौ. मनिषाताई केळकर (अध्यक्ष टिटवाळा-मोहने मंडळ), सौ. विमल भोसले (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष), सौ. मंगल सावंत, सौ. निर्मला पवार, दीपाली रंदवे तसेच आदी महिला उपस्थित होत्या।