22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » मधु मंगेश कर्णिक यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र

मधु मंगेश कर्णिक यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२२’ व्यासंगी साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे आणि कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा केली. दोन लाख रूपये रोख, मानपत्र, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे २५ नोव्हेंबरला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी चव्हाण यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार कृषी औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती, कला क्रीडा या क्षेत्रात भरीव आणि पथदर्शी कार्य करणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस देण्यात येतो. २०२१ मध्ये हा पुरस्कार कोरोना काळात संपूर्ण देशासह जगभर कोरोना लस पुरविणाऱ्या पुण्यातील सायसर पुनावाला यांच्या सिरम कंपनीस दिला आहे. यंदा तो मधु मंगेश कणिक यांना देण्यात येणार आहे.

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी मराठी साहित्यात सातत्याने कसदार लेखन करून मोलाची भर घातली आहे. त्यांच्या लेखन कलेचा विस्तार आणि आवाका लक्षात घेऊन तसेच मराठी साहित्यात केलेल्या बहुविध योगदानाची गौरवपूर्ण नोंद घेऊन सन २०२२ चा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार कर्णिक यांना देण्यात येत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

कर्णिक यांनी १९९० साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. २००२ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव, जनस्थान आदी पुरस्कारांसह कर्णिक यांना उल्लेखनीय असे ३० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

Related posts

खासदार संजय राऊत यांनी केले पत्रकार संघाच्या उपक्रमांचे कौतुक

Bundeli Khabar

श्रमजीवी संघटनेच्या आदोलनच्या इशा-याची पोलिसांनी घेतली दखल

Bundeli Khabar

शरद पवार इनस्पायर फेलोशीपचे निकाल जाहीर; कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!