किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! – लहान मुलांसोबत बाईकवरुन प्रवास करताना स्पीड ४० कि.मी. पेक्षा जास्त नसावी*
रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ मध्ये काही सुधारणा केल्या आहेत – यामुळे आता लहान मुलांसोबत बाईकवरुन प्रवास करताना वाहनांची स्पीड ४० कि.मी. पेक्षा जास्त नसावी – असे केंद्र सरकारने सांगितले
काय सांगितले केंद्र सरकारने ?
नवीन नियमानुसार – वाहन धारकाने त्याच्या मागे बसलेल्या ९ महिने ते ४ वर्षे वयोगटातील मुलांना त्यांच्या डोक्याच्या साईजचे क्रॅश हेल्मेट घालावे
तसेच हे हेल्मेट भारतीय मानक ब्युरो ने मान्यता दिलेली असावी – तसे न केल्यास चालकावर कारवाई करण्यात येईल तसेच मुलांना मोटारसायकलवर घेऊन जाताना स्पीड ४० कि.मी.पेक्षा जास्त नसावी
हेल्मेट कसे असावे
हेल्मेट हे वजनाने हलके आणि अॅडजस्टेबल असावे – वॉटरप्रूफ आणि टिकाऊ असावे – तसेच संरक्षक उपकरणे हेवी नायलॉन किंवा मल्टीफिलामेंट नायलॉनपासून बनवलेले असावे
तसेच सुरक्षा उपकरण मजबूत असावे जे 30 किलोपर्यंतचं वजन सहज सहन करु शकेल – असे परिवहन मंत्रालयाने सांगितले केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय- सर्व नागरीकांसाठी , नक्कीच खूप महत्वाचा आहे.असे डॉ. श्री. मनिलाल रतिलाल शिंपी ( ठाणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा पथक प्रमुख)यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना संगीतले.
Home » केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करावे- मनिलाल शिंपी
previous post
Related posts
- Comments
- Facebook comments