36.4 C
Madhya Pradesh
May 5, 2026
Bundeli Khabar
Home » केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करावे- मनिलाल शिंपी
महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करावे- मनिलाल शिंपी

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! – लहान मुलांसोबत बाईकवरुन प्रवास करताना स्पीड ४० कि.मी. पेक्षा जास्त नसावी*
रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ मध्ये काही सुधारणा केल्या आहेत – यामुळे आता लहान मुलांसोबत बाईकवरुन प्रवास करताना वाहनांची स्पीड ४० कि.मी. पेक्षा जास्त नसावी – असे केंद्र सरकारने सांगितले
काय सांगितले केंद्र सरकारने ?
नवीन नियमानुसार – वाहन धारकाने त्याच्या मागे बसलेल्या ९ महिने ते ४ वर्षे वयोगटातील मुलांना त्यांच्या डोक्याच्या साईजचे क्रॅश हेल्मेट घालावे
तसेच हे हेल्मेट भारतीय मानक ब्युरो ने मान्यता दिलेली असावी – तसे न केल्यास चालकावर कारवाई करण्यात येईल तसेच मुलांना मोटारसायकलवर घेऊन जाताना स्पीड ४० कि.मी.पेक्षा जास्त नसावी
हेल्मेट कसे असावे
हेल्मेट हे वजनाने हलके आणि अॅडजस्टेबल असावे – वॉटरप्रूफ आणि टिकाऊ असावे – तसेच संरक्षक उपकरणे हेवी नायलॉन किंवा मल्टीफिलामेंट नायलॉनपासून बनवलेले असावे
तसेच सुरक्षा उपकरण मजबूत असावे जे 30 किलोपर्यंतचं वजन सहज सहन करु शकेल – असे परिवहन मंत्रालयाने सांगितले केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय- सर्व नागरीकांसाठी , नक्कीच खूप महत्वाचा आहे.असे डॉ. श्री. मनिलाल रतिलाल शिंपी ( ठाणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा पथक प्रमुख)यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना संगीतले.


Bundelikhabar

Related posts

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात शिक्षण अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक संपन्न

Bundeli Khabar

समाजसेवियों को मिला वॉकहार्ट फाउंडेशन शाइनिंग स्टार अवार्ड

Bundeli Khabar

ऑल इंडिया स्मॉल न्यूज़ पेपर एसोसिएशन (आइसना) द्वारा सुख शांति समृद्धि पत्रिका के संपादक जीतु सोमपुरा का सम्मान

Bundeli Khabar
error: Content is protected !!