31.7 C
Madhya Pradesh
June 18, 2025
Bundeli Khabar
Home » केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करावे- मनिलाल शिंपी
महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करावे- मनिलाल शिंपी

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! – लहान मुलांसोबत बाईकवरुन प्रवास करताना स्पीड ४० कि.मी. पेक्षा जास्त नसावी*
रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ मध्ये काही सुधारणा केल्या आहेत – यामुळे आता लहान मुलांसोबत बाईकवरुन प्रवास करताना वाहनांची स्पीड ४० कि.मी. पेक्षा जास्त नसावी – असे केंद्र सरकारने सांगितले
काय सांगितले केंद्र सरकारने ?
नवीन नियमानुसार – वाहन धारकाने त्याच्या मागे बसलेल्या ९ महिने ते ४ वर्षे वयोगटातील मुलांना त्यांच्या डोक्याच्या साईजचे क्रॅश हेल्मेट घालावे
तसेच हे हेल्मेट भारतीय मानक ब्युरो ने मान्यता दिलेली असावी – तसे न केल्यास चालकावर कारवाई करण्यात येईल तसेच मुलांना मोटारसायकलवर घेऊन जाताना स्पीड ४० कि.मी.पेक्षा जास्त नसावी
हेल्मेट कसे असावे
हेल्मेट हे वजनाने हलके आणि अॅडजस्टेबल असावे – वॉटरप्रूफ आणि टिकाऊ असावे – तसेच संरक्षक उपकरणे हेवी नायलॉन किंवा मल्टीफिलामेंट नायलॉनपासून बनवलेले असावे
तसेच सुरक्षा उपकरण मजबूत असावे जे 30 किलोपर्यंतचं वजन सहज सहन करु शकेल – असे परिवहन मंत्रालयाने सांगितले केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय- सर्व नागरीकांसाठी , नक्कीच खूप महत्वाचा आहे.असे डॉ. श्री. मनिलाल रतिलाल शिंपी ( ठाणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा पथक प्रमुख)यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना संगीतले.

Related posts

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानची दैदिप्यमान शैक्षणिक वाटचाल

Bundeli Khabar

अभिनेता सुनील शेट्टी ने बढ़ाया एएएफटी का शिक्षा मिशन

Bundeli Khabar

राज्यस्तरीय गझल लेखन महास्पर्धेच्या चौथ्या पर्वाला जानेवारीपासून प्रारंभ

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!