36.2 C
Madhya Pradesh
May 6, 2026
Bundeli Khabar
Home » भारतीय राष्ट्रीयत्व संपूर्ण जगाला जोडण्याचा मार्ग मोकळा करते : मोहनराव भागवत
महाराष्ट्र

भारतीय राष्ट्रीयत्व संपूर्ण जगाला जोडण्याचा मार्ग मोकळा करते : मोहनराव भागवत

Bundelikhabar

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन एका पुस्तकात
समाविष्ट करणे शक्य नाही : राजनाथ सिंह

मुंबई,/गुरुदत्त वाकदेकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आजच्या काळाशी सुसंगत राजनैतिक तसेच संरक्षणविषयक विचार आणि ते सत्तेत असते तर भारताची फाळणी टळू शकली असती, यासंदर्भात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार आणि भारत सरकारचे सध्याचे माहिती आयुक्त उदय माहूरकर तसेच सहलेखक चिरायू पंडित यांनी माहितीपूर्ण, विश्लेषणात्मक असे वीर सावरकर : दी मॅन हू कुड हॅव प्रिव्हेन्टेट पार्टिशन’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याचे प्रकाशन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मला आनंद आहे की, गेल्या काही वर्षांत, काही लोकांनी वीर सावरकरांच्या जीवनावर अतिशय कष्टाने संशोधन केले, प्रामाणिक विश्लेषण केले, परिणामी आज वीर सावरकरांच्या जीवनावर काही चांगली आणि संशोधन करण्यायोग्य पुस्तके उपलब्ध झाली आहेत. हे पुस्तक देखील या मालिकेतील एक नवीन दुवा बनेल. वीर सावरकरांचे जीवन एका पुस्तकात स्पष्ट करणे शक्य नाही. अशी पुस्तके सावरकरांच्या जीवनाबद्दलचे गैरसमज दूर करतील. जनता वीर सावरकरांना समजू शकली नाही. सशस्त्र बंड हा देखील एक पर्याय असावा असे सावरकरांचे मत होते. काही लोक त्याला होम फॅसिस्ट किंवा मार्क्सवादी म्हणतात किंवा लेनिनच्या विचारसरणीने प्रेरित आहेत, पण वीर सावरकर हे राष्ट्रवादी होते आणि दुसरे काही नव्हते. स्वातंत्र्यानंतर सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम झाली. संघ आणि सावरकरांवर बरेच भाष्य करणार्‍यांचे मूळ लक्ष्य स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद आहेत. भारताचे खरे राष्ट्रीयत्व या तिघांनी प्रथम जाहीर केले होते. सावरकर या तीन लोकांच्या विचारांमुळे बनले आहेत. भारत एक राष्ट्रीयत्व आहे, जे संपूर्ण जगाला जोडण्याचा मार्ग मोकळा करते आणि ज्यांना असे वाटते की त्यांचे सामील होणे त्यांचे दुकान बंद करेल त्यांना हे होऊ द्यायचे नव्हते, असे विचार सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी व्यक्त केले. उदय माहूरकर यांनी शंभर वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व्यक्त केलेल्या विचारांच्या शुद्धतेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, आज वीर सावरकरांना डाव्या आणि इस्लामवाद्यांनी बदनाम केले आहे. सावरकर हे केवळ क्रांतिकारकच नव्हते, तर त्याचवेळी ते एक सशक्त राष्ट्रवादी विचारवंतही होते. त्याच्या विचारांमुळेच भारत सुरक्षित राहू शकला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते तर विचारवंत होते. जर त्यांच्या विचारांचे पालन केले असते तर भारताची फाळणी झाली नसती. त्यांचे हिंदुत्व बिनशर्त राष्ट्रवाद आहे. उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांचेवीर सावरकर : दी मॅन हू कुड हॅव प्रिव्हेन्टेट पार्टिशन’ पुस्तक ऐतिहासिक पुराव्यांसह हा घटक सादर करते.
या पुस्तकासाठी आवश्यक संदर्भांचे स्त्रोत आणि अन्य माहितीसाठी मुंबईस्थित वरिष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कृतिशील अनुयायी अशोक शिंदे यांचे सहकार्य असल्याचा उल्लेख प्रस्तावनेत उदय माहूरकरांनी केला आहे. या कार्यातील सहभागाबद्दल लेखक द्वयींसह त्यांचेही अभिनंदन समाजातील विविध स्तरांतून केले जात आहे.


Bundelikhabar

Related posts

ठाण्यातील ज्वेलर्सचा खून करणाऱ्या चार आरोपींना नौपाडा पोलिसांनी केली अटक

Bundeli Khabar

अंबाडीत पुरेशी जागा नसल्यामुळे वज्रेश्वरीत ग्रामीण रुग्णालय सुरू करावे

Bundeli Khabar

पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ, भिवंडी संचालित वोक्हार्ट फाऊंडेशन कला व विज्ञान उच्च माध्यमिक आश्रमशाळा – नुतन इमारत उदघाटन व हस्तांतरण समारंभ.

Bundeli Khabar
error: Content is protected !!