किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भारतीय किसान संघटनेने पुकारलेल्या भारत बंदच्या आंदोलनास भिवंडी ग्रामीण काँग्रेस ने जिल्हा अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष श्री. दयानंद मोतीराम चोरघे यांच्या आदेशानुसार भिवंडी येथील रांजनोली रिलायन्स पेट्रोल पंम्प समोर युवक काँग्रेसचे पदाधिकारी व भिवंडी ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष निलेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले यांच्या समवेत प्रमुख उपस्थिती म्हणुन सरचिटणीस ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस पंकज अशोक गायकवाड हे सुद्धा उपस्थित होते।
भारतातील शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी धरणे आंदोलन केले.तसेच भिवंडी ग्रामीण मध्ये संयुक्त किसान संघटना यांच्या सर्व पक्षीय आंदोलनाला पाठिंबा सुध्दा दिला. या आंदोलनामध्ये मुफ्फसिल पटेल, ज्ञानेश्वर(बाला)हुकमाळी, सुधाकर इताडकर, संजय गायकवाड,प्रभाकर शेळके, राजेश जाधव,रोहन जाधव, प्रशांत जाधव,अतिश भोईर,रोशन थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते ।

