किशोर पाटील/महाराष्ट्र
पालघर : कल्याण शहरातील श्री स्वामीनारायण ट्रस्ट,रोटी डे ग्रुप व कच्छ युवक संघ कल्याण यांच्या सौजन्याने श्री स्वामीनारायण ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश बळवंतराय ठक्कर व सर्व पदाधिकारी यांनी रविवार दि.२२/०८/२०२१ रोजी कल्याण शहरातील विविध विभागात जाऊन तेथील अनाथ,गोरगरीब,गरजु मुलांना खाऊ,नाष्टा,मिठाई वाटप केली,तसेच ते रोजच ५०० नागरिकांना कम्युनिटी किचन च्या माध्यमातून जेवण देतात.व आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात।
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.त्यांच्या या स्त्युत उपक्रमाला दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…