सुनिल जगताप/महाराष्ट्र
कल्याण : अटाळी आंबिवली व्यापारी मित्र मंडळातर्फे कोकण पूरग्रस्तांना धान्य वाटप करण्यात आले. पोलादपूर व महाड या तालुक्यातील दिवील, कापडे, उमरठ, ढवळे, चांदणे,खोपडे या गावांना मदत दिली।
यावेळी मंडळाचे अध्यक्ष नारायनशेठ पाटील, उपाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे , सेक्रेटरी संजय साळुंके, खजिनदार दिनेश पटेल, उपखजिनदार राजू जडेजा, उप कार्याध्यक्ष विठ्ठल वाघ व स्थानिक ग्रामस्थ हजर होते. या उपक्रमाबद्दल व्यापारी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे ग्राहक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमास आवारी सर व संजय पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले।