मुम्बई / संतोष साहू
मुम्बई : गेल्या महिन्यात महाड येथे घडलेली दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आणि विनाशकारी होती. या संकट काळात त्वरित मदतीची अपेक्षा आणि ठोस उपाययोजनांची गरज होती आणि उपायांची आवश्यकता होती अशावेळेस २४ वर्षीय सुशांत गणेश जाबरे (सर्वात कमी वयाचे उद्योजक तसेच ‘एविजीअसंअसं केअर्स इंडिया फोरम’ एनजीओचे संस्थापक) यांनी फीड द नीड उपक्रमांतर्गत मदतीसाठी धाव घेतली।
यह भी पढ़ें-वायरल वीडियो: प्रतिभा
नैसर्गीक आपत्तीकाळात गरजूंपर्यत मदत पोहोचविण्याकरिता सुशांत जाबरे यांनी विशेष मोहिम राबविली. ते व त्यांचे स्वयंसेवक गरजूंपर्यत जीवनावश्यक वस्तू, पाण्याच्या बाटल्या, ब्लँकेट्स, सॅनिटरी नॅपकिन पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य करत आहेत. बीसीबी, बोहो, क्सओवयॊ चे सर्वेसर्वा अनिकेत पाटील, बॅरल अँड कंपनीचे संस्थापक सुमित सिंग, बॅस्टियन हॉस्पिटॅलिटीचे संस्थापक रणजीत बिंद्रा आदी फीड द नीड मोहिमेसाठी मदत देत आहेत.
सुशांत जाबरे केवळ आर्थिक मदत न करता अचानक आलेल्या नैसर्गीक आपत्तीने उध्वस्त झालेल्या तसेच खचून गेलेल्या कुटुंबियांना मानसिक आधार देखील दिला आहे. जीवनावश्यक वस्तू गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस असून माणुसकीच्या नात्यानं आम्ही मदतीचा हात दिल्याचेही सुशांत जाबरे यांनी स्पष्ट केले. दलाई लामा यांनी सांगितल्याप्रमाणे ‘प्रेम आणि करुणा आवश्यक आहेत, विलासिता नाहीत’. त्यांच्याशिवाय माणुसकी टिकू शकत नाही. या तरुणाने हे दाखवून दिले आहे की एकमेकांना मदत करण्याला कोणतीही सीमा नसते, आपल्याला फक्त आपले सामाजिक आणि काल्पनिक सीम मिटवून योग्य दिशेने झेप घेणे आवश्यक आहे।