मुम्बई / प्रमोद कुमार
डोंबिवली :- महाड, पोलादपूर, खेड व चिपळूण परिसरात पूर परीस्थिती मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहें. पुरामुळे घरातील सर्वच वाहून गेले असे अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे।
यह भी पढ़ें-द्वारकामाई संस्था के वार्ड अध्यक्ष पर पर अकील नदाफ की नियुक्ति
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी, आमदार रवींद्र चव्हाण ह्यांच्या पुढाकाराने, भाजयुमो कल्याण जिल्ह्याच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. दि. २ ऑगस्ट रोजी मदत साहित्य पूरग्रस्त भागात वाटण्यासाठी युवा मोर्चा पदाधिकारी डोंबिवलीतुन निघाले आहेत. या वेळी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, सचिव बाळा पवार, युवा मोर्चा चे अमित चिकणकर, मितेश पेणकर, समीर भंडारी, सत्येंद्र दुबे, राधिका पाटील इ. पदाधिकारी उपस्थित होते।
डोंबिवलीतील कुडाळदेशकर सहयोग संस्था, सर्वोदय लीला सोसायटी ह्यांच्या माध्यमातून पिण्याचे पाणी, धान्य किट ह्यासाठी सहकार्य मिळाले. आज पाठवलेल्या सामानात प्रामुख्याने ब्लॅंकेट, सॅनिटरी नॅपकिन्स, अँटीफंगल औषधे, रेडी टू इट खाद्यपदार्थ, स्लिपर्स, चटई आणि अन्नधान्य याचा समावेश आहे।