भिवंडीतील पिंपळास गावातील धक्कादायक प्रकार आला समोर, भूमीवर्ड गेटवरील पाईप लाईन आणि शेतकऱ्यांच्या घरचा रस्ता केला बंद।
भगवानदास विश्वकर्मा/ भिवंडी
:ठाणेजिल्ह्यतील भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावातील राहणारे गणेश पाटील यांच्या वडिलांनी वयाच्या,90 व्या वर्षी माझ्या जागेवरती अतिक्रमण होत असल्याचा आरोप करून देखील कोन गाव पोलिसांनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याने यांचा या धक्क्याने मृत्यु झाल्याची घटना घडली होती त्यानंतर पोलीस आणि महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज पिंपळास गावच्या हद्दीतील भूमिवर्ड गेटवर राहणारे गणेश पाटील यांच्या घराची नाकाबंधी करून त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शेतकऱ्यांचा वाली पोलीस उपायुक्त, ठाणे आयुक्त,तहसीलदार,प्रांत अधिकारी,,जिल्हाधिकारी,महसूल सचिव, आणि महसूल मंत्री त्याच बरोबरोबर राज्यपाल यांचे लक्ष आहे कीं नाही असा सवाल शेतकरी गणेश पाटील यांनी केला आहे।