फोटो स्रोत :- गुगल
ना कोणता हार, ना कोणता बँडबाजा, ना शॅम्पेन च्या बॉटल, ना फटाक्यांची आतषबाजी, ना ढोल ताशे, ना घराला रंगरंगोटी आणि ना काही सजावट…
दर चार वर्षांनी होणाऱ्या जगातील सगळ्यात मोठ्या ऑलम्पिक स्पर्धेत देशाला पहिलं पदक जिंकून देणारी मिराबाई चानू आज किती साधेपणाने आपल्या घरच्यांसोबत आपलं यश साजरं करत आहे।
यह भी पढ़ें- रिब्रँडिंगच्या प्रक्रियेत लक्षात ठेवण्यासारखे ७ टप्पे
आपल्याच घरच्यांसोबत घरी बनवलेलं साधं अन्न खाताना कोणताही गर्वाचा किंवा देशासाठी इतकी मोठी कामगिरी केल्याचा लवलेश नाही. भारतीय सेनेत सैनिक असणाऱ्या आपल्या भावासोबत केलेलं जमिनीवर पाटावर बसून केलेलं जेवण आणि घरातील साधेपणा परिस्थितीची संपूर्ण कल्पना आपल्याला देऊन जातो।
अश्या प्रतिकूल परिस्थितीतून भारतासाठी पदक जिंकणाऱ्या मिराबाई चानू ला माझा सॅल्यूट।

