किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : कल्याण शहरातील यांच्या सौजन्याने श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण चे अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश बळवंतराय ठक्कर यांच्या सौजन्याने त्यांच्या सर्व पदाधिकारी यांनी सातत्याने सुरू ठेवलेली सामाजिक बांधिलकी जपत कल्याण शहरातील विविध विभागात जाऊन तेथील अनाथ,गोरगरीब,गरजु १००० मुलांना दिवाली निमित्त मिठाई बॉक्स चे वाटप केले तसेच ते रोजच ५०० गरीब, गरजु,अनाथ, बालकांना मोफत कम्युनिटी किचन च्या माध्यमातून जेवण देतात.व आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.त्यानी गुरुवार दि. ११/११/२०२१ रोजी कल्याण शहरातील एकुण् २०० दिव्यागाना स्वामीनारायण सभागृह , शंकर राव चौक कल्याण पश्चिम येथे मोफत धान्याचे वाटप केले. यामिनी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अँबेसिडर (राजदुत) डॉ. श्री. मणिलाल रतिलाल शिंपी उपस्थित होते।
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा गौरव केला आहे. त्याचप्रमाणे नुकताच राजभवन मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सन्माननीय भगतसिंग कोशारी यांच्या शुभहस्ते त्यांचा कॉर्न योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

