किशोर पाटील/महाराष्ट्र
वाडा : उत्तरप्रदेशातील लखिमपुर खिरी येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडघटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला वाडा शहरात व तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. आघाडी सरकार मधील मित्र पक्षांतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काॅंग्रेसच्या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन लखिमपुर येथील शेतकरी हत्याकांड घटनेचा निषेध करुन हे कृत करणा-यांना कठोर शिक्षा द्या अशी मागणी करीत ् केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत वाडा शहरात मोर्चा काढला.
आजच्या बंदमध्ये वाडा, कुडूस, खानिवली तसेच विक्रमगड येथील बाजारपेठ पुर्णता बंद होती. मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेस सुरु होत्या.