किशोर पाटील/महाराष्ट्र
वाडा : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत संवेदनशीलतेने स्वत:हून कामगारांच्या समस्या जाणून घेत आहेत. यासाठीच राज्यभरात कामगार मेळावे घेतले जात आहेत. या माध्यमातून कामगारांच्या समस्यांची सखोल माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविणार असल्याचे प्रतिपादन माथाडी कामगार जनरल सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख राकेश पाटील यांनी कूडूस येथे केले।
कूडूस येथे गुरुवारी माथाडी कामगार सेनेच्या कार्यालयाच्या उद्घाटन करण्यात आले. या वेळी शिवसेना पालघर उप जिल्हाप्रमुख सुनील पाटिल यांनी कूडूस शहरात जी कार्यालयाची गरज होती ती परशुराम भोईर व धनंजय ठाकरे यांनी माथाडी जनरल कामगार सेनेनेच्या माध्यमातून केले असल्याने त्यांना आमचे सहकार्य नेहमीच असेल तर स्थानिक भूमिपुत्रांना तुम्ही न्याय द्याल आशी प्रतिक्रिया धनंजय पष्टे सर यांनी आपल्या भाषणात सांगितले यावेली पालघर जिल्हा प्रमुख राकेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील पाटिल, युवासेना तालुका प्रमुख नीलेश पाटील, शिवसेना उप तालुका प्रमुख भावेश पष्टे, शहर प्रमुख प्रकाश शेटे, पत्रकर अनिल पाटील, कंचाड युवा सेना अधिकारी सागर मानविंदे,ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत चौधरी, सखाराम चौधरी दिलीप चौधरी, योगेश भानुशाली, यांच्या सह शिवसैनिक व बहुसंख्य माथाडी कामगार उपस्थित होते. या कार्यक्रमाची रूपरेषा परशुराम भोईर व धनंजय ठाकरे यांनी आयोजित केली होती तर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रणित चौधरी, माणिक भोईर,, मंगेश घोडविंदे व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले।

