किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : आजच आपल्या सर्वांकडे
गणपती बाप्पा आले आहेत. भारतीय बाजारपेठेत चायनिज अगरबत्त्यांचा सुळसुळाट झाला आहे. अत्यंत सुपीरियर वेगवेगळ्या , प्रचंड सुवासिक, लांबीला जास्त, गोल्डन किंवा सिल्व्हर कलरच्या, संख्येने जास्त आणि किमतीने कमी अशा सुलक्षणी अगरबत्या विक्रेत्याला तसेच घेणाऱ्याला ही भुरळ घालतात.. ह्या अगरबत्त्या जळाल्यानंतरही राखेमध्ये त्यातील सोनेरी रंग तसाच रहातो. मंदिरामध्ये गेल्यानंतर अंगारा / विभूती कपाळाला लावल्यानंतर तेच बोट जिभेवर टेकवन्याची सवय भरपूर जणांना आहे ।
त्यामुळे सावधान.. अत्यंत घातक केमीकल्स आपल्या पोटात जाऊन आपल्याला दमा,टिबी,कॅन्सर,नपूसकता यासारखे दुर्धर आजार होण्याची शक्यता १००%,शक्यता आहे ती नाकारू शकत नाही.तसेच पूढील पिढीत विकलांग, बुद्धीहीन, दुर्बल आपत्ये जन्मास येणे इत्यादी परिणाम होऊ शकतात. जी अग्नितही जळत नाहीत अशा केमिकलचा परिणाम अणूबाॅम्बच्या रेडीएशन एवढाच होतो. कृपया असल्या अगरबत्त्या विकतच घेऊ नका, स्वत: लाऊ नका,दुसऱ्याला ही लाऊ देऊ नका. असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा व्यापारी आघाडी चे ग्रामीण अध्यक्ष श्री यशवंत महादू सोरे
यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून समस्त नागरिकांना केले आहे।