मनसेच्या मागणीला मिळाले यश
संदीप शेंडगे/महाराष्ट्र
मोहोने : वडवली उड्डाणपुलाच्या बाजूला लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर अटाळी व आंबिवली या गावांच्या नावांचा उल्लेख करून नवीन नामफलक तयार करण्यात यावा ही मागणी मनसेने केली होती।

वडवली रेल्वे गेट जवळ बनविण्यात आलेल्या उड्डाणपूलालगत महानगर पालिकेने दिशादर्शक नामफलक लावला होता त्यात केवळ मोहोणे टिटवाळा आणि वडवली या तीनच गावांचा उल्लेख करण्यात आला होता ही बाब मनसेचे उपशहर अध्यक्ष रुपेश पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ९ ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त व नगररचना विभाग शहर अभियंता कार्यकारी अभियंता प्रकल्प शहर वाहतूक शाखा व अ प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन त्या नामफलकात अटाळी आंबिवली या गावांचा उल्लेख करावा अशी मागणी केली होती व याबाबत संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केला।

या मागणीची दखल घेऊन १२ ऑगस्ट रोजी केवळ तीन दिवसांत कारवाई होऊन नामफलकवर आज वडवली आणि अटाळी हे नाव टाकण्यात आले असून सदर बोर्डावर जागा नसल्याने पाऊस थांबला की नवीन नामफलक लावण्यात येणार आहे त्या नवीन बोर्ड वर आंबिवली हे नाव टाकण्यात येईल असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे।

