27 C
Madhya Pradesh
July 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20210804 WA0015
महाराष्ट्र

समाधानकारक पावसाने पाण्याची चिंता मिटली,भातसा धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा

Bundelikhabar

मुम्बई / उमेश जाधव
शहापूर-: गेल्या काही दिवसात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळं पाणी टंचाईची टांगती तलवार दूर झाल्यात जमा आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा धरणातून पाणी पुरवठा होतो. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यामुळं धरणांतील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे।

यह भी पढ़ें- चिंतन से हमेशा चिंता मुक्ति मिलती है: आचार्य श्री विद्यासागर जी महाराज

शहापूर तालुक्यातील भातसा धरणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही ९४२ दशलक्ष घनमीटर आहे. तर आजघडीला ७८० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणात सध्या ७९.१९ टक्के पाण्याचा साठा आहे।

आतापर्यंत भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १७१२ मिलीमीटर पाऊस झाला असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी दिली. यंदा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने सध्याच्या धारणातील पाणीसाठ्यामुळं पाणी टंचाईची
टांगती तलवार दूर झाल्यात जमा झाली आहे।


Bundelikhabar

Related posts

राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी द्वारा आगस्ट क्रांती दिन का आयोजन

Bundeli Khabar

आईजी इंटरनेशनल ने पीडब्ल्यूसी की सहायता से ईएसजी कार्यक्रम पर दिया ज़ोर

Bundeli Khabar

हिंदुत्व में सशक्त भूमिका निभा रहे हैं लक्ष डेढा

Bundeli Khabar
error: Content is protected !!