सर्व नागरिकांना रेल्वे प्रवास करण्याची अनुमती मिळावी व इतर मागण्यांसाठी रेलरोको आंदोलनाचा इशारा (आगरी युवक संघटना )
कोरोना विषाणु महामारी मुळे सामान्य माणसाना उपाशी मरण्याची वेळ आली आहे.केंद्र सरकारने मार्च 2020 पासुन (कोविड-19) कोरोना व्हायरस विषाणु पसरु नए या साठी धारा १४४(संचार बंदी) घोषित करुन सरकारने सामान्य जनतेसह गोरगरिबांना उपाशीपोटी लॉकडाऊनच्या नावे घरात डांबुन मारण्याचा षडयंत्र रचले आहे,गोरगरिब लोकांच्या हिता साठी *आगरी युवक संघटना *(आयुस) प्रमुख गोविंद भगत नी मुंब्रा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांना निवेदन दिले।
आगरी युवक संघटना *(आयुस) प्रमुख गोविंद भगत यांच्या निवेदन आर्जा माफत कोविड-19 नियमात फेरबदल करण्यात यावे अशी मागणी केली आहे त्यातील मुख्य विषय 1) सर्वांसाठी रेल्वे प्रवासाची अनुमती मिळावी 2) मास्क वापरण्याची व लसीकरणाची जबरदस्ती नसावी 3) केंद्र व राज्य सरकारर्ने संपुर्ण लॉकडाऊन व सर्व प्रकारचे निर्बंध त्वरीत हटवुन सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरु करण्याची परवानगी सर्व सामान्य नागरिक,कामगार,व्यापरी व कारखानदारांना ध्यावी।
निवेदन देऊन हि जर सरकारने बंदी हटवली नाही तर (आयुष) दि.17.08.2021 रोजी दुपारी 12.30 वाजता दिवा स्थानकात येथे रेलरोको आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे।

