संतोष साहू/महाराष्ट्र,
मुंबई : नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्ताननेभारताची दाणादाण उडवत सामना एकहाती जिंकला. यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींची प्रचंडचनिराशा झाली आहे. माजी खेळाडू विनोद कांबळीसुद्धा याला अपवाद नाही.
विनोद कांबळी यांनी कू वर एका व्हीडिओद्वारे आपल्या भावना मांडल्या आहेत. यात अतिशयभावनिक होऊन बोलताना ते म्हणतात, “कालच्या पराभवानंतर मी अतिशय दु:खी आहे. काल भारताला पाकिस्तानने अतिशयसहजपणे हरवले. एकदम ‘ओम फट्ट स्वाहा’ अशी भारताची अवस्था झाली. माझ्या मनातखूप सारे प्रश्न उभे राहिले आहेत. काल काय झाले? नेमकी चूक कुठे झाली? यात मुख्य गुन्हेगार कोण आहे? आपण एक विकेट घेऊ शकलो नाही, ना एक बॉल परतवू शकलो. काय आहे हे सगळं?’
हार्दिक पांड्या याच्यावर तर कांबळीने विशेष राग व्यक्त केला. तो म्हणाला, हार्दिक तू दुखापत झालेली असतानाहीखेळतो आहेस. मी तुला इतकेच सांगेन, फिटनेस मिळव. हार्दिक पांड्या, जाके खेल दांडिया!’
https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=940f802d-78e6-4510-a63e-4d33e28fc139

